नागपूर

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडून पळवाट - अजित पवार

सरकारनामा ब्युरो

नागपूर -

बोंड अळीच्या लक्षवेधीवर चर्चा करण्याची विरोधकांनी मागणी केली आहे. विरोधी पक्ष नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पळवाट काढत असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांना काय समस्या आहेत याची माहिती सरकारला कशी मिळत नाही, असा प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केला. बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी यावर आजच चर्चा करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. तर, 'सरकार गंभीर नसून वेळकाढूपण करत आहे. हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर लिहून देतो असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते, मग आता मुख्यमंत्री का चर्चा करत नाहीत? कामकाजात जो विषय लक्षवेधी आहे, तो पुढे ढकलण्याचे कारण काय?' असे सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केले. 'सरकार या सभागृहाला गांभीर्याने घेत नाही. तीन वर्षांपासून हे चित्र सभागृहात दिसते आहे. ही लक्षवेधी पुढे का ढकलली याचे कारण सरकारने द्यावे. सरकारने दिलगिरी व्यक्त केली पाहिजे,' अशी मागणी दिलीप वळसे पाटील यांनी सरकारला केली.

विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देत 'स्वतःचा प्रेस्टिज इशू करू नये,' असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे. तसेच सरकार उत्तर देईल आणि सरकार चर्चा करायला तयार आहे असेही त्यांनी सभागृहात सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT