नागपूर

शिवसेनेशी बंडखोरी करुन आशिष जयस्वाल लढणार अपक्ष?

सरकारनामा ब्युरो

नागपूर - नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदार संघ भाजप-शिवसेना युतीमध्ये शिवसेनेसाठी सोडणार नसल्याची माहीती आहे. त्यामुळे रामटेकमधून तीन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल बंडखोरी करुन अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत.

2014 मध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी भाजपचे डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी त्यांचा पराभव केला होता. पराभूत झाल्यानंतरही जयस्वाल यांनी मतदारांशी संपर्क तोडलेला नाही आणि जनसंपर्क कायम ठेवत मतदारसंघाची बांधणी केली. सध्या ते महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आहेत. यावेळी युतीमध्ये रामटेक शिवसेनेसाठी सोडला जाईल, असा विश्‍वास त्यांना आजही आहे. पण असे न झाल्यास अपक्ष लढण्याची त्यांची तयारी सुरु आहे. 

यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता, "25 वर्षापासून सच्चा शिवसैनिक म्हणून कार्य करीत आहे. तीन वेळा आमदार झालो. पण कोणताही डाग स्वतःवर किंवा पक्षाला लागेल, अशी कृती केली नाही. पक्षाचा प्रत्येक निर्णय शिरसावंद्य मानला. पण राजकारणात निवडणुकीपासून दूर राहू शकत नाही. मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. लढण्याची जिद्द त्यांच्यात आहे. युतीमध्ये रामटेक शिवसेनेसाठी सुटेल, असा विश्‍वास आहे. अजुनही आशा सोडलेली नाही. पण जर युतीमध्ये शिवसेनेला रामटेक मिळाला नाही, तर कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊन जनतेच्या भावनांचा विचार करु. त्यानंतर येत्या 2 ऑक्‍टोबरला भूमिका स्पष्ट करुन निणय जाहीर करु', असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT