नागपूर

ममता दीदी को 'जय श्रीराम'.....भाजयुमोने पाठविले तीन हजारांवर पोस्टकार्डे

सरकारनामा ब्युरो

नागपूर : पश्‍चिम बंगालमध्ये 'जय श्रीराम' म्हणण्याचा ममता बॅनर्जींनी कडाडून विरोध केला आहे. त्यावरुन सद्यस्थितीत चांगलेच वादळ उठले आहे. अशातच नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चाने ममता बॅनर्जींना 'जय श्रीराम' असा मजकूर लिहीलेली पोस्टकार्डे आज पाठवली. भाजयुमोच्या शहराध्यक्ष शिवाणी दानी यांच्या नेतृत्वात आज सकाळी कार्यकर्ते जीपीओमध्ये एकत्र आले आणि "ममता दीदी को 'जय श्रीराम'चे नारे देत टपाल कचेरीतून तीन हजाराहून अधिक पोस्ट कार्ड त्यांना पाठविली.

ममता बॅनर्जींनी धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरलेला आहे. हा बुरखा फाडण्याची वेळ आली आहे. त्या धर्मनिरपेक्ष असल्याचे ढोंग करतात आणि केवळ मतांचे राजकारण करतात. पश्‍चिम बंगालमध्ये 'जय श्रीराम'महणणाऱ्यांना अटक करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. या मुद्यावरुन त्यांनी सध्या जे काही चालविले आहे, ते तात्काळ थांबवले पाहीजे. आज आम्ही पाठविलेले पोस्टकार्ड ही त्यांना इशारा आहे. आता त्यांनी सुधरावे, अन्यथा त्यांना जी भाषा समजते, त्या भाषेत नागपूर भाजयुमोचे कार्यकर्ते तेथे जाऊन त्यांना समजावतील," असे शिवाणी दानी यांनी आजच्या आंदोलनाच्या वेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT