नागपूर

फडणवीस सरकार राज्यावरचे विघ्न, ते टळू दे : अशोक चव्हाण 

सरकारनामा ब्युरो

कळंब (जि. यवतमाळ) ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील सरकार हे लोकांसाठी विघ्न ठरले असून या विघ्नापासून जनतेची लवकर सुटका करावी, असे साकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कळंबच्या चिंतामणीच्या गणपतीला घातले. 

कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याला आज यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथून सुरूवात झाली. ही यात्रा यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांमध्ये फिरणार आहे. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, की गेल्या चार वर्षांपासून फडणवीस सरकार राज्यात सत्तेवर आहे. या सरकारने समाजातील कोणत्याही वर्गाच्या विकासाला चालना दिली नाही. राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या योजनेचा बोजवारा उडाला आहे. राज्य सरकार कर्जाच्या ओझ्याखाली आले आहे. फडणवीस सरकार एक विघ्न म्हणून राज्यात अवतरले आहे. 

यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री वसंतराव पुरके, शिवाजीराव मोघे, माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, यवतमाळ जिल्हा कॉंग्रेसचे अध्य वजाहत मिर्झा, नागपूरचे माजी महापौर विकास ठाकरे आदी उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT