नागपूर

वीजप्रश्‍नी आमदार वीरेंद्र जगताप यांनी अभियंत्यांना धरले धारेवर

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : चांदूररेल्वे, धामनगाव, नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यात अनियमीत वीजपुरवठ्यामुळे ओलीताचे काम प्रभावीत झाले आहे. या संदर्भात जाब विचारण्यासाठी आमदार वीरेंद्र जगताप व जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी शेकडो शेतकऱ्यांसह वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंत्यांच्या दालनात दोन तास ठिय्या दिला. 

चांदूररेल्वे, धामनगाव व नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यात कृषीपंपाच्या वीजपुरवठ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकरी सिंचन सुविधांपासून वंचित आहेत. या संदर्भाने तत्काळ उपाययोजना करुन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी तीनही तालुक्‍यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. 

मात्र भारनियमन, सतत खंडित होणारा विजपुरवठा, अनेक रोहित्र नादूरुस्त व बंद आहेत. अनेक ठिकाणी तुटलेले व लोंबकळलेले तार असल्याने जिवंत विद्युत तारांमुळे शिवारात अपघाताची शक्‍यताही बळावली आहे. काही ठिकाणी वीज तारांची चोरी झाल्याने वीजपुरवठा अनेक दिवस खंडीत ठेवला जातो, असाही शेतकऱ्यांचा आरोप आहे. 
शेतकऱ्यांच्या याच समस्यांबाबत विचारणा करण्यासाठी आमदार जगताप यांनी वीज वितरण कपंनीच्या अभियंत्यांना धारेवर धरले. मुख्य अभियंता सुचिता गुजर, कार्यकारी अभियंता दिलीप मोहोड यांची आमदारांचे समाधान करताना चांगलीच भांबेरी उडाली. यावेळी रवी बिरे, मोहन सिंघवी, अंजनसिंगीचे सरपंच अवधूत दिवे, नितीन कनोजिया, दीपक सवई, राजा तिडके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT