नागपूर

राजकारण्यांनी इतर गोष्टींत हस्तक्षेप करू नये : नितीन गडकरी

सरकारनामा ब्युरो

पुणे : राजकारण हे सत्ताकारण नाही. मात्र, आज सत्ताकारणाचा अर्थ केवळ राजकारण झाला आहे. राजकारणाचा भावार्थ समजून घेतला पाहिजे. राजकरणाची सिमीत मर्यादा आहे. त्यामुळे राजकारण्यांनी इतर गोष्टींत हस्तक्षेप करू नये, असे स्पष्ट मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज यवतमाळ येथील मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपात व्यक्त केले.

आणिबाणीच्या काळातील आठवणी सांगताना गडकरी यांनी साहित्यिकांची भूमिकेकडेही लक्ष वेधले. ते म्हणाले, की पु. ल. देशपांडे आणि दुर्गा भागवत यांनी आणिबाणीच्या काळात घेतलेल्या सभांना राजकारणांच्या सभांपेक्षाही जास्त गर्दी होत होती. म्हणून पु. ल. देशपांडे किंवा दुर्गा भागवत यांनी कधीही राज्यसभेचे तिकिट मागितले नाही. आणिबाणीच्या विरोधात त्यांनी संघर्ष केला आणि आपले काम संपल्यावर बाजूला झाले. 

राजकारणी आणि साहित्यिकांमध्ये को-ऑपरेशन, को-ऑर्डिनेशन आणि कम्युनिकेश पाहिजे. एकमेकांच्या मर्यादा सांभाळून एकमेकांकडून शिकले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT