नागपूर

....अन् नितीन गडकरींनी शिजवली खिचडी

सरकारनामा ब्युरो

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात खिचडी शिजविली. खिचडी शिजविल्यानंतर प्रश्‍न विचारल्यानंतर मात्र त्यांनी पत्रकारांची डाळ शिजू दिली नाही. 

काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याने नितीन गडकरी वादात सापडले होते. त्यांच्या काही वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्‌विट केल्याने नितीन गडकरी यांना सावध पवित्रा घ्यावा लागला. राज्यातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आज 3 हजार किलो खिचडी शिजविण्याचा 'विश्‍वविक्रम' केला. हा विश्‍वविक्रम पाहण्यासाठी नितीन गडकरी गेले होते. 

यावेळी नितीन गडकरी यांनीही पातेल्यात खिचडी शिजविण्यासाठी मदत केली. विष्णू मनोहर यांची खिचडी तर शिजली. त्यानंतर नितीन गडकरींना प्रश्‍न विचारण्यासाठी पत्रकार सरसावले. परंतु, गडकरी यांनी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्‍नाला उत्तर दिले नाही. पत्रकारांनी आजचा ताजा विषय केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताबद्दलही विचारणा करून पाहिली. परंतु, त्यावरही कोणतेही उत्तर न देता गडकरी यांनी दुसऱ्या कार्यक्रमाला जाणे पसंत केले. गडकरींसमोर डाळ न शिजल्यानंतर अखेर पत्रकारांनाही फक्त खिचडी खाण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT