नागपूर

मोदींमुळे लोकशाही धोक्यात - शरद पवार

सरकारनामा ब्युरो

पुणे - आज सबंध देशात एक चिंतेचे वातावरण आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे, याला एकमेव व्यक्ती कारणीभूत आहे. ती व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. पुन्हा याच विचारांचे सरकार जर सत्तेत आले तर देशात लोकशाही टिकेल की नाही, हा प्रश्न आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमरावतीत बोलताना सांगितले. 

संयुक्त पुरोगामी लोकशाही महाआघाडीच्या अमरावती मतदारसंघातील अधिकृत उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थित कार्यकर्त्यांना आणि मतदारांना संबोधित करताना शरद पवार बोलत होते. 

श्री. पवार पुढे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये आले, तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत, असे तज्ज्ञांचे मत आहे. पण माझा आपल्या देशातील लोकांवर प्रचंड विश्वास आहे. लोकशाहीला वाचवण्यासाठी निर्णय घेण्याची ज्यावेळी वेळ येते, तेव्हा लोक लोकशाहीच्या बाजूनेच निर्णय घेत असतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT