आर्णी (जि. यवतमाळ): राज्य सरकारने येत्या पंधरा दिवसांत नक्षलवाद्यांचा खात्मा करावा, अन्यथा आम्ही नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या स्थळापासून आंदोलन करू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. आमदार कडू यांनी तरोडा येथे भेट देऊन शहीद आग्रमन रहाटे यांना श्रद्घांजली अर्पण करून कुटुंबीयांसोबत संवाद साधला.
नक्षलवादी क्षेत्रांत कितीच्या संख्येने गेलो पाहिजे, काय उपाययोजना करायला पाहिजे, दोन वाहने सुरक्षित निघतात, ज्या वाहनात मोठ्या संख्येने जवान असतात. तेच वाहन कसे टार्गेट केले जाते. याबाबत त्यांनी संशय व्यक्त केला. दहशतवादी हल्ल्यात संपूर्ण देश एकत्र येतो. मात्र, नक्षली हल्ल्याबाबत सरकार गंभीर दिसत नसल्याबद्दल आमदार कडू यांनी खंत व्यक्त केली. नक्षलवाद्यांपेक्षा एका जिल्ह्यातील शिपायांची संख्या जास्त आहे. नक्षल्यांच्या हल्ल्यात गरीब घरातील मुलेच शहीद होत आहेत, ही बाब दुर्देवी आहे. सरकारने पंधरा दिवसात निर्णय न घेतल्यास आम्हीच गडचिरोली जिल्ह्यात जावून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.