yashomati thakur visits amravati
yashomati thakur visits amravati  
नागपूर

मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या... "ये सूरत बदलनी चाहिए'

सरकारनामा ब्यूरो

अमरावती ः मंत्रिपदाची शपथ घेताना पहिल्यांदा तर काहीच सुचलं नाही. मात्र दुसऱ्या क्षणी दारिद्रय कमी झालं पाहिजे. एकीकडे खूप वैभव आणि दुसरीकडे अभावच अभाव, हे चित्र बदलले पाहिजे, या धारणेतून चांगलं काम करायचं, अशी खूणगाठ मनाशी बांधली. धारणा चांगली असेल तर कामेही चांगलीच होतात, असे ऍड. यशोमती ठाकूर म्हणाल्या.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे शुक्रवारी (ता. तीन) प्रथमच शहरात आगमन झाले. सायंकाळी पाच वाजता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

सध्या कर्जमाफीचा विषय प्राधान्यक्रमावर आहे. सोबतच अवेळी पाऊस व गारपिटीने शेतीपिकांचे नुकसान झालेले आहे. त्याचे सर्वेक्षण दोन-चार दिवसांत होईल. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राजकारणाच्या पलिकडे जाऊन विषय हाताळले जातील. अपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेणे, मेळघाटचे पर्यटन वाढविणे व कृषी क्षेत्रात बदल घडवून आणणे. जिल्ह्यात उद्योगांची संख्या वाढविणे, टेक्‍सटाईल्स क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे अन्य देशात स्थलांतरीत होऊ पाहणाऱ्या उद्योगांना सवलती देऊन थांबविणे, ऑटोमोबाईल्स इंडस्ट्रीज जिल्ह्यात आणण्यासाठी पुरक वातावरण निर्माण करणे इत्यादी बाबींकडे लक्ष देणार असल्याचे ऍड. यशोमती ठाकूर म्हणाल्या.

यापूर्वीच्या सरकारने काही योजनांवर खूप कर्ज घेतले. ते कमी करून शेतकऱ्यांना दिलासा देणे हा विषय समोर आला. सरकारमध्ये सर्वच मंत्री तोलामोलाचे आहेत. मंत्रिमंडळ दमदार आहे. लोकप्रतिनिधी जनतेच्या कामासाठीच असतात. जनतेची कामे झाली नाही तर पदाचा काहीच उपयोग नाही. हे लक्षात घेता मंत्रिपदाचा प्रत्येक क्षण लोकांच्या कामासाठी द्यायचा मनोमन ठरविले आहे. 2004 ते 1019 हा काळ खूप संघर्षाचा रहिल्याचे यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.

राज्यमंत्र्यांना सल्ला
राज्यमंत्री बच्चू कडू आणि आपला स्वभाव आक्रमक आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी टोकाची भूमिका न घेता सामज्यस्याच्या भूमिकेने प्रशासनाला सोबत घेऊन चालले पाहिजे. दिरंगाई हा गुन्हाच आहे, अधिकाऱ्यांनीसुद्धा संवेदनशील होऊन काम केले पाहिजे, असे त्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दोन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे दिलेल्या निर्देशाबाबत बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT