नाशिक

370 व्या कलमाचा निर्णय दोन बहाद्दरांच्या हातूनच होणार होता : गिरीश महाजनांची प्रतिक्रीया 

सरकारनामा ब्युरो

नाशिक : ''रामजन्मभूमी, मुस्लीम महिलांचा तलाकचा प्रश्‍न यांसह विविध प्रश्‍न कॉंग्रेसला सोडवायचे नव्हते. त्यांना देशाचे हित पहायचे नव्हते. अशा अनेक प्रश्‍नांवर त्यांचे पितळ आता उघडे होत चालले आहे. या प्रश्‍नावर एकमत होत नसल्याने यापुढे या महत्वाच्या प्रश्‍नांवर अशाच पध्दतीने निर्णय घेतले जातील," असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगीतले. 

जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत आज येथे 370 वे कलम रद्द करुन जम्मी-काश्‍मीर आणि लद्दाख केंद्रशासित प्रदेश केल्याने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी "कश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. सगळे जग आज भारताच्या बाजुने उभे राहते आहे. अशा स्थितीत दोन बहाद्दरांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांच्याच हातून हा निर्णय होणार होता.'' असे सांगतीले. 

''देशवासीयांच्या मनात असलेला विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी आज सोडवला. ही घटना सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी आहे. देशाच्या इतिहासातील हा महत्वाचा निर्णय आहे. अमेरिका पाकिस्तानला रसद पुरवीत होती. त्यातून काश्‍मीरच्या भूमीवर अतिरेक्‍यांना प्रवेश दिला जात होता. जनतेचा कौल त्याच्या विरोधात होता. राजकीय नेतृत्व त्यासाठी सिध्द आहे हे आजच्या निर्णयातून भाजपने सिध्द केले आहे.'' असेही महाजन म्हणाले.

''काश्‍मीरचा प्रश्‍न आमच्या दृष्टीने प्राधान्याचा विषय होता. दोन खासदार असतानाही हीच भूमिका होती. त्यावरच आम्ही राजकीय वाटचाल केली. आम्ही आज तो सोडवला. कॉंग्रेसने काहीही केले नाही. तलाक विषयावर तर त्यांनी मतांचे राजकारण केले. मुस्लीम समाजातील भगीनींचा विचार केला नाही.'' अशी टीकाही महाजन यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT