नाशिक

आण्णा डांगे आदिवासींचे वकिल केव्हापासून झाले? : मधुकर पिचड 

संपत देवगिरे

नाशिक : "अण्णा डांगे केव्हा आदिवासी झालेत? ते कशाला आमची उठाठेव करीत आहेत. त्यांनी आदिवासींची वकिली करणे बंद करावे. राज्यातील सर्व आदिवासी आमदार, खासदारांना समाजाचे हित कळते. ते समर्थ आहेत. राज्य शासनावर दडपणासाठी कोणी काहीही विधाने करु नयेत', असा इशारा ज्येष्ठ आदिवासी नेते, माजी मंत्री मधुकर पिचड यांनी अण्णा डांगे यांना दिला आहे. 

सांगलीत काल धनगर आरक्षणासाठी अण्णा डांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी बोलताना धनगर समाजाला आरक्षण द्याल तर आम्ही पाठींबा काढून घेऊ अशी भूमिका आदिवसी आमदारांनी घेतल्याचे विधान अण्णा डांगे यांनी केले होते. 

याविषयी श्री. पिचड म्हणाले, हे सांगणारे अण्णा डांगे कोण? डांगे आमच्या आमदारांचे पुढारी केव्हा झाले? डांगे कधी आदिवासी झाले. त्यामुळे बिगर आदिवासी आणि खोटे आदिवासींनी आदिवासींची वकिली करण्याचे काहीही कारण नाही. उगाच सरकारला बिचकावण्यासाठी काहीही बातम्या देऊ नये. आदिवासींच्या हिताचा काय निर्णय करायचा हे राज्यातील सर्व चोविस आदिवासी आमदार आणि सहा खासदार एकत्र बसून ठरवू. आमची उठाठेव करण्याची बाहेरच्या लोकांनी करु नये. राज्यातील सर्व आदिवासी या प्रश्‍नावर एकत्र आहेत. आमचे हित आम्हाला कळते. वेळ आल्यावर निर्णय घेऊ. आजी, माजी सर्व आमदार या प्रश्‍नावर एक आहोत. सरकारवर दबाव आणण्याचे आज काहीच कारण नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT