नाशिक : सरकार स्थापनेबाबत विविध स्तरावर विचारविनिमय सुरु आहे. त्यात कोणताही वाद नाही. येत्या 9 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या बैठकीत याबाबत सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
परतीच्या पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रामणात नुकसान झाले आहे. त्याच्या पाहणीसाठी महाजन आज नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी ते म्हणाले, ''सरकार स्थापनेविषयी 9 नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी आहे. त्यामुळे फारशी कालजी वाटत नाही. 9 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेत्यांची बैठक होईल. त्या बैठकीत निश्चितपणे तोडगा निघेल. कोणताही वाद राहणार नाही. सरकार स्थापनेचा निर्णय तेव्हा होईल.''
ते पुढे म्हणाले, ''मुख्यमंत्री एकटे नाहीत. आमचे पक्षाचे टिमवर्क आहे. मुख्यमंत्री, चंद्रकांत दादा पाटील हे नेते आहेत. आमची समिती कार्यरत आहे. सर्व त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेच्या घडामोडींत मुख्यमंत्री एकटे नाहीत. पक्ष त्यांच्या सोबत आहे. मी स्वतः दिवाळीत आठ दिवस मुंबईतच होतो. सर्व आमदार त्यांच्या सोबत आहेत. सध्या आमची भूमिका 'वेट अँड वॉच'ची आहे. लवकरच चित्र स्पष्ट होईल.''
शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करीत असल्याच्या बातमी विषयी आपल्याला काहीही मिाहिती नाही. या प्रक्रीयेत किंवा सत्तेच्या देवान घेवाण व अन्य निर्णयात मी सहभागी नाही, असाही दावा महाजन यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.