नाशिक : दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या मनात राज्य शासनाच्या कर्जमाफीविषयी गोंधळ आहे. अनेकांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे. नाशिकच्या एका शेतकऱ्याने यासंदर्भातच कृषीमंत्री दादा भुसे यांना फोनद्वारे संपर्क केला. मात्र, ददा भुसे यांनी अतिशय शांतपणे त्याचे म्हणणे ऐकले. उपाययोजना सांगीतली. अन् काळजी करु नका शासन प्रश्न सोडवेल, असा ठाम विश्वास दिल्याने राग व्यक्त करण्यासाठी फोन केलेल्या या शेतकऱ्याने मंत्र्यांचे आभार मानले.
सय्यद पिंपरी येथील ढकिले या शेतकऱ्याने नुकताच कृषीमंत्री दादा भुसे यांना दूरध्वनी केला. हा दुरध्वनी मंत्री भुसे यांनीच उचलला. कृषीमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केल्यावर या शेतकऱ्याने 'मला तुमच्याशी एक मिनीट बालोयचे आहे, बोलू का' असे विचारले. मंत्री भुसे यांनीही अभिनंदन केल्याने आभार मानत जरुर बोला, असे सांगीतले. त्यानंतर या शेतकऱ्याने आपल्या सरकारने कर्जमाफी केली. मात्र, माझे कर्ज अडीच लाख आहे. त्याचा मला काय फायदा होणार? आम्ही काय करायचे? असा नाराजीचा सूर लावला.
त्यावर भुसे यांनी या शेतकऱ्याला आश्वस्त केले. अजिबात नाराज होऊ नका. काळजी करु नका. सरकार तुमचा प्रश्न निश्चित सोडवेल. दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेले शेतकरी तसेच नियमीत कर्जफेड करणारे यांच्याबाबात निर्णय घेण्यासाठी शासनाने उपसचिवांची समिती नेमली आहे. ही समिती येत्या पंधरा दिवसांत त्यांचा अहवाल देईल. त्यानंतर सरकार दोन लाखांहून अधिक कर्ज असलेल्यांविषयी योग्य निर्णय घेईल. तुम्ही काहीच काळजी करु नका, असा ठाम विश्वास त्यांना दिला. मंत्र्यांच्या या आश्वासक उत्तराने नाराजीसाठी फोन केलेल्या शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले. ही ऑडीओ क्लीप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामुळे त्याची चर्चा आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.