नाशिक

छगन भुजबळ म्हणाले, "लोकसंख्या नियंत्रणासाठी समुपदेशनास कुणाचीच ना नाही'

सरकारनामा ब्युरो

नाशिक : देशापुढे अनेक समस्या व गंभीर प्रश्‍न आहेत. त्यावर कार्यवाही करण्याची गरज आहे. मात्र सध्या हे प्रश्‍न बाजुला ठेऊन रोज नवे विषय काढून जनतेला फिरवत ठेवले जात आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच दोन अपत्यांविषयी कायदा करण्याची वेळ आली आहे असे विधान केले होते. त्यावर भुजबळ यांनी तिक्रीया व्यक्त केली. ते म्हणाले, देशापुढे अनेक प्रश्न आणि समस्या असतांना रोज नवीन मुद्दे काढायचे आणि त्यावर लोकांना फिरवत ठेवायचं,

चर्चांवर चर्चा घडवत ठेवायच्या. हे सध्याच्या राजकर्त्यांचे धोरण आहे. यात कोणाचेही हित नाही. हे थांबले पाहिजे. यापेक्षा देशात शांतता कशी राहील, बेरोजगारी, महागाई कशी कमी होईल जनतेचे प्रश्न कसे सुटतील यावर समंजस कारभाऱ्यांनी चर्चा करावी.

ते म्हणाले, लोकसंख्या नियंत्रणासाठी लोकांचं समुपदेश करायला कुणाचीच ना नाही. मात्र कोणताही कायदा करतांना सर्व पक्षांसोबत, सर्व समाजासोबत चर्चा करून निर्णय झाला पाहिजे. तसे होतांना दिसत नाही. मुळ प्रश्न बाजूला ठेवून निरर्थक मुद्दे काढले जातात आणि त्यावर चर्चा होत राहतात, हे काही बरोबर नाही

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT