we have no magic stic says gulabrao patil
we have no magic stic says gulabrao patil 
नाशिक

सरकारकडे जादूची कांडी नाही : गुलाबराव पाटील

सरकारनामा ब्युरो

जळगाव : छु मंतर करीत जनतेचे प्रश्‍न सोडविण्याची सरकारकडे जादूची कांडी नाही, आमचे सरकार वेगाने काम करीत आहे. निदान सहा महिने तरी आम्हाला वेळ द्या, त्यानंतर तुम्ही आंदोलन करा असे मत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

राज्य सरकारच्या विरोधात भाजपच्या नेत्यांनी आता आंदोलन सुरू केले आहे. पंकजा मुंडे आज औरंगाबाद येथे उपोषणास बसल्या होत्या. त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहभाग घेतला. 

याबाबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, आमच्या सरकारला अद्याप महिना पूर्ण होत आहे. त्या दृष्टीने आम्ही वेगाने कार्य करीत आहोत. मात्र आमच्याकडे छु मंतर करीत लगेच प्रश्‍न सोडविण्याची जादूची कांडी नाही. पंकजाताई माजी मंत्री होत्या, त्यांना प्रशासनातली जाण आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलनाची घाई करायला नको होती. मराठवाड्याच्या पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी "मराठवाडा ग्रीड' ही 24 हजार कोटीची योजना आहे. त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. मुख्यमंत्र्यासमेवत त्याबाबत बैठकही झाली आहे. आपण स्वत:त्या बैठकिस होतो.त्यामुळे त्यांनी किमान सहा महिने तरी वाट पहायला हवी,त्यानंतर जर आम्ही प्रश्‍न सोडविण्यास कमी पडलो तर त्यांनी आमच्याविरूध्द जरूर आंदोलन करावे. परंतु त्यांनी आता आम्हास वेळ देवून थांबायला हवे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT