जळगाव : जनतेने आम्हाला सत्तेचा कौल दिला आहे. त्यामुळे तुम्ही सत्तेत का नाही, असे जनताच आम्हाला विचारेल, त्यामुळे आम्ही जास्त दिवस विरोधात राहणार नाही, असे वक्तव्य माजी विरोधीपक्षनेते व भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जळगाव येथे केले. नवे सरकार आकस बुद्धीने राज्यातले प्रकल्प रद्द करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला
भाजपची उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक जळगाव येथे आज आयोजित केली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते. यावेळी माजी मंत्री गिरीष महाजन, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार विजय गावीत, खासदार हिना गावीत आदी आमदार उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, ''जनतेने भाजपाला सत्तेत बसविण्याचा कौल दिला, त्यामुळे जनता आम्हाला विचारेल की तुम्ही सत्तेत का नाही. त्यामुळे आता आम्ही विरोधी पक्षात जास्त काळ राहणार नाही,''
सध्याच्या सरकारने विविध प्रकल्पाना दिलेल्या स्थिगीतीवर बोलतांना विखे-पाटील म्हणाले, "युती सरकारच्या मंत्री मंडळात शिवसेनचे मंत्री देखील होते. त्यावेळी कॅबिनेटच्या बैठकीत कामांना मंजुरी दिली जात होती. मग त्या वेळी त्यांनी विरोध केला नाही. केवळ आकस बुध्दीने आता प्रकल्पांना विरोध होत असून राज्यात विकासपासून रोखण्याचा हा प्रयत्न होत आहे,''
तसेच खाते वाटप विलंबावर बोलतांना विखे पाटील म्हणाले, ''नविन सरकार हे त्यांच्या पद्धतीने निर्णय घेईल. त्यांनी खाते वाटप कधी करावे हा त्यांचा निर्णय आहे. आम्हाला देखील कोणतीच घाई नाही. नागपुर अधिवेशनात काय भूमीका घ्यायची हे आम्ही पक्षाच्या बैठकीत ठरवू.''
हे देखिल वाचा - ..तर पत्रकार परिषद घेऊन पुरावे देईन - एकनाथ खडसे
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.