पुणे : महाराष्ट्रभर पसरू लागलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करण्याचा विश्वास देतानाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याआधी जनतेशी संवाद साधून मुख्यमंत्री ठाकरे यांनी एक पाऊल पुढे टाकले. लगेच दुसऱ्या दिवशी जनतेशी एकटेच न बोलता कोरोनाविरोधात मोहिमेचे सूत्रधार आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख मुख्य सचिव अजोय मेहता यांनाही आपल्यासोबत घेतले.
कोरोनाने भयभीत झालेल्या देशवासियांशी पंतप्रधान मोदी यांनी गुरूवारी (ता. 19 मार्च) रात्री संवाद साधला. मोदी हे देशाला उद्देशून भाषण करणार असल्याचे गुरूवारी सकाळी घोषित झाल्यानंतर ठाकरे यांनीही मग जनतेला मार्गदर्न केले. कोरोनाविरोधातील युद्ध जिंकण्याचा इरादा करीत, या लढ्यात पंतप्रधान मोदीही आपल्यासोबत उतरल्याने मुख्यमंत्री ठाकरेंनी त्यांचे कौतुक केले.
कोरोनाला आटोक्यात ठेवण्यासाठी राज्य सरकार खंबीर आहे. परंतु, लोकांनी आपापपल्या पातळ्यांवर प्रचंड काळजी घ्यावी. कोणी उगाचच घाबरू नये. हे युद्ध आपण जिंकणार असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी अवघ्या राज्याला दिला. पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला होता. तेव्हा ते एकटेच होते.
त्यानंतर शुक्रवारी (ता. 20 मार्च) मात्र टोपे आणि मेहता यांच्यासमवेत ते लाइव्हच्या माध्यमातून लोकांपुढे आले. दोघांनीही विशेषपणे फ्रेममध्ये ठेवल्याचे दिसून येत होते. तिघांवरही कॅमेरा रोखण्यात आलेला होता. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री या पदावरील व्यक्ती आपल्यावर कॅमेरा हटवू देत नाहीत. किंवा कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये इतरांना येऊ देत नाही. ठाकरे यांचे विशेषपणा येथे दिसून आला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.