Ashadhi Wari Toll Exemption : पंढरपूरला वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांच्या वाहनांना राज्य सरकारने पूर्ण टोल माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
याबाबतचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा शासनाने दिला आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने राज्यभरातून अनेक वारकरी पंढरपूला जात असतात.
विठ्ठलाच्या नामघोषात पंढरीकडे प्रस्थान करणाऱ्या या वारकऱ्यांसाठी 18 जून ते 10 जुलै दरम्यान टोलमाफी करण्यात आली आहे. तसंच पंढरपूरला जाणाऱ्या 10 मानाच्या पालखी मार्गावर ही टोलमाफी देण्यात आली आहे.
2025 च्या आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकांच्या व वारकऱ्यांसाठीच्या सोयी-सुविधा, वारकऱ्यांच्या वाहनांची टोलमाफी आणि वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीतील चर्चेनुसार हा टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये पंढरपूरला जाणाऱ्या जड आणि हलक्या वाहनांना टोलमाफीचा फायदा मिळणार असल्याचं नमूद केलं आहे. तर यासाठी संबंधित वाहन क्रमांक, वाहन चालकाचे नाव नोंद करून त्याचे स्टिकर्स परिवहन विभाग, पोलिस किंवा आरटीओ यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.