Amol kolhe-Shivajirao Adhalrao Patil Sarkarnama
पुणे

Kolhe Vs Adhalrao: आढळरावांना नाटकं जमत नाहीत, मात्र धंदा चोख जमतो; कोल्हेंचे उत्तर

Sudesh Mitkar

Pune News: महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल सभा झाली. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या व्यवसायाच्या संदर्भाने टीका करत असताना शिवाजीराव आढळराव पाटील यांना नाटकं जमत नसल्याचा उपरोधिक टोला लगावला. या टीकेला उत्तर देताना आढळराव पाटील यांना नाटकं जमत नाहीत हे खरं आहे; मात्र त्यांना जनतेच्या मतांवर संसदेत जाऊन धंदा करता येतो, अशी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी टीका केली.

अमोल कोल्हे म्हणाले, "खेड आणि शिरूरच्या जनतेने आढळराव पाटील यांना तीन वेळा संसदेत पाठवले, मात्र आढळराव पाटील यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांऐवजी स्वतःच्या कंपनीचे उखळ पांढरे करण्यात धन्यता मानली, अशा उमेदवाराचे समर्थन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे काय करू शकतात असा सवालही डॉ. अमोल कोल्हे यांनी विचारला.

देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या विकासावर बोलणाऱ्या नेत्याने शिरूरच्या (Shirur Lok Sabha Constituency 2024) जनतेसमोर पूर्ण सत्य मांडणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी आढळराव नाटकं जमत नाहीत एवढंच अर्धसत्य सांगून, त्यांना जनतेच्या मतांचा जोगवा मागून संसदेत जाऊन धंदा चांगला करता येतो हे मात्र सांगितलं नाही असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

Loksabha Election news in Marathi | Get latest & Top news on Loksabha Election (esakal.com)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या विकासावर बोलणाऱ्या नेत्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे, इंद्रायणी मेडिसिटी यांसारखे प्रकल्प का रखडले? अनेक विकास कामांमध्ये खोडा घालण्याचं काम कोणी केलं यावर बोलणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी त्यांच्या उमेदवाराच्या स्थानिक आणि निरर्थक मुद्द्यांवर वक्तव्य केलं असंही कोल्हे यांनी म्हटलं आहे.

व्यवसायावर आज उपमुख्यमंत्री फडणवीस देखील बोलले मात्र त्यांना नेमका कशाचा त्रास होतो, असा प्रश्न डॉ. कोल्हे यांनी विचारलाय. मी इतरांसारखं रात्रीचं वेशांतर तर केलं नाही ना? छत्रपती संभाजी महाराजांचे विचार जगभरात पोहोचवून मी चूक केली का? आपल्या सारख्या विकासावर बोलणाऱ्या नेत्यांकडून हे अपेक्षित नव्हतं, तरीही धन्यवाद अर्धसत्य का होईना बोललात. पूर्णसत्य हेच आहे की आढळराव पाटलांना नाटकं जमत नाही पण जनतेने विश्वासाने निवडून दिल्यानंतर स्वतःच्या कंपनीचा धंदा चोख जमतो, असं म्हणत वाढदिवसाच्या आरोपांना उत्तर दिलं.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT