Devendra Fadnavis, Amruta Fadnavis Latest News
Devendra Fadnavis, Amruta Fadnavis Latest News Sarkarnama
पुणे

फडणवीस पुण्याचे पालकमंत्री झाल्यास.. अमृता फडणवीस म्हणतात...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबरोबरच त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक ही पुण्यातून लढवावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून केली आहे. यावर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

"फडणवीस यांची जन्मभूमी, कर्मभूमी, बालेकिल्ला नागपूर आहे, पण असं असलं तरी आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी ते काम करतात. पुणं माझं आजोळ आहे. मला जेव्हा चान्स मिळतो तेव्हा मी येथे येते असते. आता ते नागपूरचे पालकमंत्री आहे. त्यामुळे ते दोन्ही जागेचे पालकमंत्री झालेलं आवडेल", असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. त्या दहीहंडी कार्यक्रमाच्या निमित्ताने आज (ता.१९ ऑगस्ट ) पुण्यात आल्या होत्या यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Devendra Fadnavis, Amruta Fadnavis Latest News)

अमृता फडणवीस म्हणाल्या की, दहीहंडी हा खेळ कृष्ण भगवान यांच्यापासून सुरू झाला आहे. त्याला पाठिंबा मिळणार आहे. खूप चांगली गोष्ट आहे की या खेळाला आरक्षण दिलं आहे. ही आपली परंपरा आहे, त्यांना वाव मिळायलाच हवा. हे आपल्या संस्कृतीसाठी खूप चांगली गोष्ट आहे, असे मत त्यांनी दहीहंडी या खेळ प्रकारातील गोविंदांना दिलेल्या आरक्षणावर व्यक्त केले.

गेल्या काही दिवसांपासून फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार आणि आता त्यांनी येथूनच खासदारकीसाठी लढवावी, अशी मागणी होत आहे, असा त्यांना माध्यम प्रतिनिधीने प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, फडणवीस यांची जन्मभूमी, कर्मभूमी, बालेकिल्ला नागपूर आहे, पण असं असलं तरी आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी ते काम करतात. मला महाराष्ट्र आवडतो, मला इथेच राहायचं आहे म्हणून त्यांना महाराष्ट्रातच बघायला आवडेल. तसेत फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होणार का? या प्रश्नावर बोलतांना त्या म्हणाल्या की, पुणं माझं आजोळ आहे. मला जेव्हा संधी मिळते तेव्हा मी येथे येते. ते सध्या नागपूरचे पालकमंत्री आहे. त्यामुळे दोन्ही जागेचे ते पालकमंत्री झालेलं मला आवडेल,अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, या नव्या सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. यावर बोलतांना त्या म्हणाल्या की, सगळ्यांना माहिती आहे की सरकार कस आलं आहे. जे बोलतात त्यांचा बेस काय आहे. जे बोलतात त्यांची विश्वासहार्यता काय आहे. त्यामुळे त्यांच्यावर कमेंटही करणं ही बिलो डिग्निटी होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT