Devendra Fadnavis and
Devendra Fadnavis and  Sarkarnama
पुणे

Politics : लग्न झालं माझ्यामुळेच झालं, पोरगा झाला माझ्यामुळेच झाला; फडणवीसांच्या ठाकरेंना कानपिचक्या

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राज्यात सध्या आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता कानपिचक्या दिल्या आहेत. मुंबईमधील विविध ठिकाणच्या विकास कामांवरून फडणवीस यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली. ते आज मुंबईत एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, ''आम्ही कोणतेही काम हाती घेतले की ते म्हणतात ते काम आम्हीच केलं. ते काम आमच्याच काळातलं आहे. पण जे अडीच वर्षाच्या कार्यकाळात दोन वर्ष घरातच बसून होते. मग त्यांनी काम कधी केलं? त्यांनी काम केलं हे म्हणणं देखील हस्यास्पद आहे'', असा टोला त्यांनी लगावला.

''उद्या कुणाचे लग्न झाले तर माझ्यामुळेच झाले, उद्या एखाद्याला पोरगा झाला तरी माझ्यामुळेच झाला असं म्हणतील, पण ही प्रवृत्ती सोडा'', अशा शब्दात फडणवीसांनी नाव न घेता ठाकरेंना कानपिचक्या दिल्या.

''अडीच वर्षातील दोन वर्ष ते घरातच होते. तरी देखील ते म्हणतात सहा महिन्यात मुंबई बदलून टाकली. पण काही लोकांची सवय असते की याचा प्रवेश झाला मीच केला. नोकरी लागली, मीच लावली. लग्न झालं मीच जुळवून दिलं, ही जी सवय आहे ती आता सोडली पाहिजे. मुंबईची जी अवस्था झाली ती तुमच्यामुळेच झाली आहे'', अशी टीका त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, आज मुंबईमधील विविध विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना कानपिचक्या दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT