Dhananjay Munde
Dhananjay Munde  Sarkarnama
पुणे

Dhananjay Munde : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं, स्वार्थासाठी सत्तेत आले : मुंडेंची शिंदे सरकारवर टीका!

सरकारनामा ब्यूरों

पुणे : अतिवृष्टीच्या संकटामुळे शेतकऱ्यांवर दयनीय परिस्थिती ओढावली आहे. शेतमालाचे मोठे नुकसान झाले. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होण्यातही प्रशासनाची उदीसीनता दिसून येते. या मुद्द्यावर आता राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

संकटग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही मदत अजूनही मिळालेली नाही. अजूनही नुकसानग्रस्त शेतीचे व शेतमालाचे पंचनामे झाले नाहीत. सरकारची शेतकऱ्यांप्रती उदासीनता दिसून येत आहे. सर्वात जास्त नुकसान विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना झाले. मात्र शेतकऱ्यांना कसलीही मदत मिळत नाही. या सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तारच उशीर झाले. सरकारकडून पालकमंत्र्यांचीही उशिरा नेमणूक झाली, अशी टीका मुंडे यांनी केली.

आमचे सरकार असताना गेल्या वर्षीही अशी परिस्थिती ओढवली होती. मात्र आम्ही शेतकरऱ्यांना मदत केली. सरकारने शेतकऱ्यांना असे वाऱ्यावर सोडून चालणार नाही.हे सरकार जनतेच्या हितासाठी सत्तेत आलं नाही, तर स्वतःच्या स्वार्थासाठी आलेत. राज्यात एवढं पीक नुकसान झालं आहे मात्र कुठलेच मंत्री फिरताना दिसत नाहीत, असे मुंडे म्हणाले.

मंत्रिमंडळाची दुसरी यादी जाहीर होणार यामध्ये पंकजा मुंडेंची वर्णी लागणार का? यावर प्रश्न विचारले असता मुंडे म्हणाले, पंकजांनी मंत्री म्हणून काम केलं आहे, त्याची पुन्हा काम करण्याची इच्छा आहे का विचारायला हवं. कारण भाजप मला विचारून मंत्रिमंडळ विस्तार करत नाहीत, असेही मुंडे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT