पुणे

पुणे महापालिकेचे विभाजन करा : चंद्रकांतदादांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले

सरकारनामा ब्युरो

पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक तोडांवर असताना तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. त्यांच्या या विधानावरुन सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु आहे.

"पुणे महापालिकेचे दोन भाग करायला हवे," असे पाटील म्हणाले. "पुणे महापालिकेचे क्षेत्र वाढत आहे. आधी यामध्ये 11 गाव समाविष्ट केली होती. त्यानंतर पुन्हा 23 गाव समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे पुण्याचे भौगोलिक क्षेत्र हे देशातील कोणत्याही महापालिकेपेक्षा मोठे झाले आहे. या समाविष्ट गावातील नागरिकांना सोयी - सुविधा द्यायच्या असतील, तर पुणे महापालिकेचे विभाजन करण्याची गरज आहे," असे पाटील म्हणाले.

पाटील म्हणाले, "पुणे हे सुरक्षित शहर आहे. त्यामुळे जितके युनिट लहान तितका त्यांचा विकास लवकर व सहज होतो. त्यामुळे पुणे महापालिकेचे दोन भाग होणे गरजेचे आहे.पुण्याचे दोन भाग करण्याची माझी राजकीय भूमिका नाही. मात्र विकास आणि बाकी समस्या बघितल्या तर दोन भाग व्हायला हवेत,"

"कोरोनात ज्यांनी दोन पालक गमावले त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी माफ करण्यात आली आहे. दोन कोटी ७९ लाख रुपये त्यासाठी देण्यात आले आहेत. वैद्यकीय आणि अ‌ॅग्रीकल्चरचा त्यात समावेश नाही. ज्यांचे एक पालक कोरोनात गमावले त्यांच्याबाबत आकडेवारी गोळा करण्यात येईल. हा विषय अद्याप तीव्रतेने आला नसून मी त्यासंर्दभात आकडेवारी गोळा करीत आहे. दोन पालक गमावलेले १९०० विद्यार्थी आहेत. त्यात ही वाढवली तर किती होईल आणि खर्च किती करण्यात येईल, याबाबत माहिती जमा करण्यात येईल. सकारात्मक भूमिकेतून याबाबत काम करण्यात येईल," असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT