CM Eknath  Shinde
CM Eknath Shinde Sarkarnama
पुणे

धनुष्यबाण कोणाचा, हे ठरण्याआधीच शिंदेचे मोठे वक्तव्य : मला चिन्हाची गरज नाही..

सरकारनामा ब्यूरो

पुणे : माझ्यावर लोक आरोप करत आहेत. मात्र, मला निवडून यायला कुठलेही चिन्ह लागणार नाही, एवढे काम मी करून ठेवले आहे. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सासवडमध्ये बोलताना व्यक्त केला.

एकनाथ शिंदे यांची बंड केल्यानतर शिवसेनेत (Shivsena) फुट पडली आहे. शिंदे यांनी शिवसेना आमची असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची याचा वाद आता निवणूक आयोगाकडे गेला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोरांनी शिवसेनेचे चिन्हा आणि बाळासाहेबांचे नाव वापरू नये, असे म्हटले होते. तर आदित्य ठाकरे यांनीही बंखोरांवर हल्लाबोल करत राजीनामा देऊन पुन्हा निवडून या, असे आव्हान दिले होते. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी असताना शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, लोक माझ्यावर आरोप लावतात की हे एकनाथ शिंदे यांनी पाप केले. मात्र, मला निवडून येण्यासाठी कोणत्याही चिन्हाची गरज नाही. मी मतदारसंघात इतकी कामे केली आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हे बंड करण्याची मला गरज नव्हती. मात्र, माझ्याकडे येणाऱ्या आमदारांमुळे हा निर्णय घ्यावा लागला.

५० आमदार माझ्याकडे येत होते. त्यांच्या मतदार संघातील गोष्टी सांगत होते. आम्ही हा निर्णय घेतला नसता तर शिवसेनेचे बोटावर मोजण्याइतकेच आमदार निवडून आले असते. सगळे पराभूत झाले, असेत. पाच-दहा वीस कोटींच्या निधीवर निवडून येता येत नाही. समोरच्या पराभूत उमेदवाराला ५०, १००, ५०० कोटी निधी मिळत होता आणि त्याचे उद्घाटन होत होते. सरकार आले असतानाही शिवसेनेचे कार्यकर्ते जेलमध्ये जात होते, म्हणून हा निर्णय घ्यावा, लागला, असे शिंदे म्हणाले.

दरम्यान, शिंद यांच्या या विधानावर शिवसेनेचे हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे म्हणाल्या, चिन्हाची गरज नाही, तर आतापर्यंत का शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली. शिवसेना चिन्ह सोडून निवडणूक का लढवली नाही, असा सवाल त्यांनी केला. एकनाथ शिंदे वैफल्यग्रस्त झाले आहेत, असा टोला कायंदे यांनी लगावला. दिल्लीश्वर आणि ४० आमदारांना सांभाळता-सांभाळता त्यांच्या नाकीनऊ आलेत. धनुष्यबाण हिसकावून घेणे इतके सोपे नाही. धनुष्यबाण चिन्ह मिळणार नाही, हे त्यांना आता कळून चुकले. उद्याच्या सुनावणीबाबत आम्ही आशादायी आहोत, असे त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT