Kiren Rijiju sarkarnama
पुणे

Kiren Rijiju News : मुस्लिमांनी आम्हाला मतदान केल्यास त्यांना खासदार बनवू, मंत्रीही करू: रिजिजू यांचं मोठं विधान

Sudesh Mitkar

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजपकडून महाराष्ट्रात मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाचा जो निर्णय सेट करण्यात आला होता. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये म्हणून भाजपकडून केंद्रीय पातळीवर प्रयत्न करण्यात येत असून त्याचाच भाग म्हणून केंद्रीय मंत्री किरण रिजिजू सध्या महाराष्ट्र दौरा करीत आहेत.

पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना किरण रिजिजू म्हणाले, महाराष्ट्र ही वीर आणि क्रांतिकारकांची भूमी आहे. मात्र, सध्या राजकीय वातावरणात महाराष्ट्र बदनाम झाला आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे आणखी प्रयत्न सुरू आहेत असा आरोप किरण रिजिजू (Kiren Rijiju) यांनी केला.

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी पुढाकार घेतला असून ते मुस्लिम समाजाची जनजागृती करण्याचे काम करीत आहेत. जे संविधान हातात पकडून फिरत आहेत. त्यांनीच संविधान, लोकशाहीची हत्या केली होती. बाबासाहेब आंबेडकरांना संसदेत येण्यापासून रोखले, मंत्रिमंडळातही घेतले नव्हते, पंडित नेहरूंनी त्यांचा वारंवार अपमान केला. हेच लोक आता भाजपकडून (Bjp) संविधान धोक्यात आहे, मुस्लिमांचा वोट बँक म्हणून वापर करत आहेत. पण दरवेळी हा समाज काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही, अशी टीका केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी केली.

मोदी सरकारने सर्वांना समान संधी दिली

अल्पसंख्याक समुदायाची दिशाभूल केली जात असल्याने ती रोखण्यासाठी मी महाराष्ट्रात सर्वत्र फिरत असल्याचे त्यांनी सांगितले. अल्पसंख्याक समुदायात सहा धर्म आहेत. पण काँग्रेसच्या काळात हे अल्पसंख्याक मंत्रालय केवळ मुस्लिमांचेच आहे, असे चित्र निर्माण केले होते. पण गेल्या 10 वर्षात मोदी सरकारने सर्वांना समान संधी देऊन त्यांचा विकास केला आहे. वोट बँक राजकीय वापर मुस्लिमांचा केला पण आम्ही सर्वांना सोबत घेऊन जात असल्याचे रिजिजू म्हणाले.

प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन बांधणार

परदेशात जाऊन राहुल देश विरोधी शक्तींच्या मदतीने कार्यक्रम घेतात आणि भारतात अल्पसंख्याक, दलित सुरक्षीत नाहीत. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे, असे खोटे सांगून देशाची बदनामी केली. महाराष्ट्रातही संविधान धोक्यात आहे, असा खोटा प्रचार केला जात आहे.

हा अल्पसंख्याक समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी मी महाराष्ट्रात आलो आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन बांधले जाणार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळणार आहे. त्यामध्ये वसतीगृह, ग्रंथालय, कौशल्य विकास केंद्र, क्रीडांगण आदीचा समावेश असणार असल्याचे रिजिजू यांनी सांगितले.

मत दिल्यास सत्तेत वाटा मिळणार

मुस्लीम समुदायाला आम्ही वेगळी वागणूक दिली नाही. पण त्यांनी मत दिले तर आमची सत्ता येईल, त्यानंतरच त्यांना सत्तेत वाटा मिळेल. मत दिले नाही तर संधी कशी मिळणार? असा प्रश्‍न रिजिजू यांनी उपस्थित केला. तसेच वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकामुळे मुस्लिमांची जमीन काढून घेतली जाणार, मशीद पाडली जाणार असे लावून स्पीकर घेऊन खोटे पसरविले जात आहे, असा कोणताही प्रकार होणार नसल्याचे रिजिजू यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT