Rupali Chakankar Security Sarkarnama
पुणे

Rupali Chakankar : धोका नसताना Y प्लस सुरक्षा; 'रुपाली चाकणकर' बनल्या रिल स्टार..., फक्त सोशल मिडियातील हवेसाठी ताफ्याचा वापर

Vaishnavi Hagawane Suicide: पोलिसांनी आणि राज्य महिला आयोगाने वैष्णवीच्या आत्महत्येआधी त्याच हगवणे कुटुंबातील सून असलेल्या मयुरी हगवणे प्रकरणात वेळीच योग्य ती कारवाई केली असती पुढील दुर्घटना घडली नसती, असंही म्हटलं जात आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर अनेकांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे.

Jagdish Patil

Pune News, 29 May : महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे. अशातच पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून केलेल्या आत्महत्येमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी आणि राज्य महिला आयोगाने वैष्णवीच्या आत्महत्येआधी त्याच हगवणे कुटुंबातील सून असलेल्या मयुरी हगवणे प्रकरणात वेळीच योग्य ती कारवाई केली असती पुढील दुर्घटना घडली नसती, असंही म्हटलं जात आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर अनेकांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे.

त्या अशा प्रकरणांमध्ये लक्ष न देता नको तिकडे राजकीय स्टंटबाजी करत असतात असंही विरोधक म्हणत आहेत. अशातच आता चाकणकरांना कोणत्याही सुरक्षेची गरज नाही. त्यांची सुरक्षा तत्काळ काढावी, अशी मागणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

रुपाली चाकणकर यांच्या जीवाला धोका नसताना त्यांना Y प्लस दर्जाची सुरक्षा का असा सवालही त्यांनी केला आहे. तर चाकणकर या महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा सोशल मीडियावर रिल करण्यासाठी वापरतात, असा आरोपही त्यांनी केला आहे. धनंजय जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, मी निवेदन करतो की, राज्यात महिलांवर अन्याय अत्याचार वाढत आहेत.

बलात्कार, हुंडाबळी, घरगुती हिंसाचार, छेडछाड अश्या घटना रोज कानावर येतात. यावरून राज्यातील मुली-महिला किती असुरक्षित आहेत हे स्पष्ट होते. शासनाच्या राज्य महिला आयोगाकडे या संदर्भात तक्रार करण्याचे शासनाचे धोरण आहे. परंतु वैष्णवी हगवणे व मयुरी हगवणे या प्रकरणात महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर व निष्काळजीपणावर अनेक प्रश्न उपस्थित झालेत.

परंतु राज्य महिला आयोगाने अन्यायग्रस्त स्त्रियांना सुरक्षा व आधार देणे अपेक्षित असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षानाच शासनाची अतिरिक्त सुरक्षा घेऊन फिरावे लागते. त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षच स्वतःची सुरक्षितता करू शकत नसतील तर त्या राज्यातील महिलांना काय न्याय देतील ? त्यांना नेमका धोका कुणापासून वाटतो?

महिला आयोगाच्या अध्यक्षाना या महाराष्ट्रात फिरताना असुरक्षित वाटते का ? असे असेल तर राज्यातील पीडित महिलांनी त्यांच्याकडून सुरक्षेची व न्यायची अपेक्षा कशी करावी? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची शासकीय सुरक्षा काढून ज्या महिला पीडित आहे व ज्यांच्या जीवाला धोका आहे.

अशा तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त होतात त्यांना ती सुरक्षा देण्यात यावी व त्यांच्या जीव वाचवावा, ही विनंती, असं म्हणत त्यांनी रुपाली चाकणकरांच्या सुरक्षेवर आक्षेप घेत त्यांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली आहे.

शिवाय महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर या महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा सोशल मिडीयावर रिल करुन हवा करणे , लाईक वाढवणे यासाठीच वापरतात हे त्यांच्याच सोशल मिडीया वरुन दिसते, असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT