Jayant Patil
Jayant Patil sarkarnama
पुणे

अजितदादा कुठलीच कागदपत्रे दडवत नाहीत

सरकारनामा ब्युरो

पुणे : ''आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं षढयंत्र भाजप करीत आहे. आमचा कायद्यावर विश्वास आहे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना न्याय दिला, महाविकास आघाडीतील नेत्यांना बदनाम करण्याचा एकच उद्देश भाजपचा आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज केला. ''अजित पवारांनी (Ajit Pawar) कशाचीच कागदपत्रे दडवली नाहीत, ते कधी कुठलीच कागदपत्रे दडवत नाहीत, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

जयंत पाटील यांनी आज श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती केली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जयंत पाटील म्हणाले की, सरकारच्या मंदिर उडण्याचा निर्णयाचे स्वागत आहे. मंदिर उघडली याचा आनंद आहे, आम्ही स्वागत करण्यासाठी सर्वच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात गेले आहेत.

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूकीच्या निकालाबाबत जयंत पाटील म्हणाले, ''तिन्ही पक्षाची ताकद मोठी आहे,आम्ही एकत्र लढलो नाही, त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूका अपयश आले, येणाऱ्या काळात आम्ही महाविकास आघाडी एकत्रित लढू. एकत्रित लढलो तरच आमची ताकद जास्त आहे, भविष्यात आम्ही जिथे शक्य असेल त्या महापालिका एकत्र लढणार आहोत.'' लखीमपूर खिरी हिंसाचाराला भाजप जबाबदार आहे. या घटनेनं शेतकरी पेटून उठला आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारनं दीड वर्षानंतर आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली केली. मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी पहाटेच जाऊन दर्शन घेतलं. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात (siddhivinayak ganpati) दर्शन घेतलं. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यानी परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिगांचे दर्शन घेतलं. ''कोरोना जाऊदे सगळीकडे आनंदाचं वातावरण राहूदे हेच मागणं आहे,'' अशी प्रार्थना राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सिद्धिविनायकाचे दर्शन केल्यानंतर केली.

सिद्धिविनायकांच्या दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ''कोरोनाचे संकट गेले दीड वर्षे आहे. त्यामुळे मंदिरं बंद ठेवावी लागली होती. कारण जिथं श्रध्दा असते तिथं भाविक मोठया संख्येने जात असतात. पहिली लाट आली दुसरी लाट त्यानंतर सर्वांचं म्हणणं होतं की आता मंदिरं खुली करायला हवीत. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आजपासून सर्व मंदिरं उघडण्यात अली आहेत. गर्दी होऊ नये, यासाठी आम्ही लवकर आलो होतो. आमचा त्यांना त्रास होऊ नये, यासाठी आम्ही लवकर आलो. आर्शीर्वाद मागितले आहेत की लवकरात लवकर कोरोना जावो. आता खूप महत्त्वाचे सण येत आहेत अशा काळात कोरोनाशी संबंधित नियम पाळावेत, अशी सर्वांना विनंती आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT