पुणे

पूरग्रस्तांना मदत करताना सरकारकडून होणारी जाहिरातबाजी दुर्दैवी : सुप्रिया सुळे (व्हिडिओ)

प्रफुल भंडारी

दौंड (जि. पुणे) :- पूरग्रस्तांना मदत करताना देखील महाराष्ट्र सरकार कडून होणारी जाहिरातबाजी दुर्देवी आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पूरग्रस्तांच्या मदत डब्ब्यांवर स्टीकर लावले नाहीत, असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी भीमा नदीकाठच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केला.

नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव असल्याने पूर परिस्थिती हाताळण्यात सरकारला अपयश आले आहे. सांगलीत पाणी वाढत असतानाही यात्रा सुरू होत्या, अशी टीकाही सुळे यांनी यावेळी केली. मंत्री गिरीश महाजन हे अंसेवदनशील मंत्री आहेत. आपण विरोधाला विरोध करीत नसून पूरग्रस्तांसाठी आपण सगळे मिळून काम करू, असेही सौ. सुळे यांनी सांगितले. राष्ट्रवादी पक्षाच्या डॅाक्टरांचे पथक पूरग्रस्त भागात रवाना झाले आहेत. मी स्वत: पूरग्रस्त भागात राहून सेवा करणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT