Sambhaji Bhide sarkarnama
पुणे

Sambhaji Bhide : पुण्यात संभाजी भिडे स्वातंत्र्याबाबत बरळले; म्हणाले, आपल्याला....

Akshay Sabale

शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं होतं. यातच आता संभाजी भिडे स्वातंत्र्याबाबत बरळले आहेत. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुणे शहरात येणार आहे. या पालखी सोहळ्यात दरवर्षी संभाजी भिडे ( Sambhaji Bhide ) असंख्य धारकऱ्यांसोबत सहभागी होतात. त्यापार्श्वभूमीवर संभाजी भिडे हे पुण्यात आले आहे. तेव्हा, संभाजी भिडेंनी स्वातंत्र्याबाबत वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले भिडे?

संभाजी भिडे म्हणाले, "आपल्याला दळभद्री स्वातंत्र्य मिळालं आहे. हिंदवी स्वराज्य हे खरं स्वातंत्र्य आहे. ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, अशा प्रत्येकी 10-10 हजार तुकड्या दररोज रायगडावर जाणार आहेत."

"गोमाता, भारतमाता, वेदमातासारख्या 7 मातांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असणं म्हणजे हिंदवी स्वराज्याचे व्रत घेणे. या व्रताची काही पथ्य आहेत. संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेली लोक आपल्याला तयारी करायची आहेत," असं संभाजी भिडेंनी म्हटलं.

दरम्यान, संभाजी भिडेंनी वक्तव्य करण्याचं आणि त्यावरून वाद होण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांनी याआधीही अशी काही विधानं केली आहेत. एका महिला पत्रकाराला भिडेंनी, "आधी टिकली लाव मगच मी तुझ्याशी बोलतो," असं म्हटलं होतं.

तसेच, देशाला म्लेंच्छ, अँग्लो आणि गांधी बाधा झाली आहे, असं विधान भिडेंनी मिरजेत केलं होतं.

तर, सोलापूरमधील एका कार्यक्रमात बोलताना भिडे म्हणाले होते, "अमेरिकेने भारतीय कालगणनेनुसार एकादशीली यान सोडल्यानं ते यशस्वी झालं."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT