पुणे

महाविकास आघाडी सरकार गोंधळलेले आणि दिशाहिन, फडणविसांचा हल्लाबोल 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : तीन महिन्यानंतरही राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सूर सापडला नाही असा हल्लाबोल विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला आहे. 

मुंबईत उद्यापासून होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमी विरोधी पक्षांना चहापानाचे सरकारतर्फे निमंत्रण दिले आहे. मात्र सरकारच्या या निर्मत्रणावर विरोधीपक्षांनी बहिष्कार घातला आहे. 

फडणवीस म्हणाले, की या सरकारची दिशा ठरत नाही. हे सरकार गोंधळ आहे. तीन पक्षाचे हे सरकार असले तरी तीन पक्षामध्ये सुसंवाद नाही. त्यांनी प्रथम आपलं चहापान करावे त्यानंतर आम्हाला निमंत्रण द्यावे. आमचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार आहे. 
राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांना हेक्‍टरी पंचवीस हजाराची मदत देणार होते. त्याचे काय झाले. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि कर्जमुक्त करणारे होते. पण, शेतकरांना ना मुक्ती आणि माफीही मिळाली नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT