संजय राऊत
संजय राऊत सरकारनामा
पुणे

संजय राऊतांनी दिला केंद्राला खोचक सल्ला !

सरकारनामा ब्यूरो

पुणे : महाराष्ट्र आणि राज्य सरकारला बदनाम करणाऱ्याचा ‘झेड प्लस’ सुरक्षा देवून सन्मान केला जात आहे. मात्र, ‘झेड प्लस’ सुरक्षा दिली गेली तरी चौकशी ही होणारच असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला.एखाद्या व्यक्तीला सुरक्षा मिळत असेल तर केंद्राकडे खूप सुरक्षा आहे असे स्पष्ट होत आहे. त्यांना काम नसेल तर ही सुरक्षा त्यांनी जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेशमध्ये दिली पाहिजे, असा खोचक सल्लाही राऊत यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

खासदार संजय राऊत यांनी समीर वानखेडे यांच्यावरील खंडणी गोळा केल्याच्या गंभीर आरोपानंतर केंद्र सरकारने दिलेल्या ‘झेड प्लस’ सुरक्षेवरुन फटकारले आहे.ते म्हणाले, ‘‘ समीर वानखेडे प्रकरणात चौकशी केली जाईलच. एखाद्याला ‘झेड प्लस’ सुरक्षा मिळाली तरी त्याची चौकशी केली जाईलच असे सूचित केले आहे.

सध्या केंद्र सरकार महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांना ३६ लोकांची झेड प्लस सुरक्षा देऊन केंद्र सरकार सन्मान करत आहे. महाराष्ट्र सुरक्षित राज्य आहे. इथे सर्व लोक सुरक्षित आहेत. एखाद्या व्यक्तीला सुरक्षा मिळत असेल तर केंद्राकडे खूप सुरक्षा आहे असे दिसत आहे. त्यांना काम नसेल तर ही सुरक्षा त्यांनी जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेशमध्ये दिली पाहिजे, असा खोचक सल्लाही राऊत यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

राज्य सरकारच्या चौकशीतून फक्त सत्य बाहेर येईल आणि निर्माण झालेल्या काही प्रश्नांची उत्तर शोधली जातील. अमली पदार्थ अटकेवरुन गेले काही महिने महाराष्ट्र सरकार बदनाम केले जात आहे. महाराष्ट्रात, मुंबईत गांजा-अफुची शेती पिकते आणि ते कापून आम्ही आमच्या गच्चीवर ठेवतो, असे वातावरण तयार केले जात असल्याचा चिमटा त्यांनी काढला.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT