राज्य

आरक्षणासाठी बीडच्या युवकांचे दिल्लीत धरणे

सरकारनामा ब्युरो

बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात आंदोलनाच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात बीड जिल्ह्याच्या मातीतूनच झाली. आता दिल्लीतही आंदोलनाचा झेंडाही बीडकरांनीच रोवला आहे. परळी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठोक मोर्चा नंतर मागच्या 20 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरुच आहे. याची धग राज्यभर पोचून सर्वत्र विविध आंदोलने झाली आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. 

या आंदोलनामुळे मेगा भरती तुर्त थांबविण्याचाही निर्णयही झाला. याच मागणीसाठी सोमवारी जिल्ह्यातील युवकांनी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर धरणे धरले. छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनीही आंदोलकांची भेट घेतली. आंदोलकांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या कार्यालयांमध्ये मागण्यांचे निवेदन दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT