राज्य

आष्टी तालुक्‍यात धानोराजवळील अपघातात 14 ठार

सरकारनामा ब्युरो

आष्टी (जि बीड) : रस्त्याच्या एका वळणावर कठडा नसल्याने खासगी प्रवासी बस खाली कोसळून झालेल्या अपघातात 14 प्रवासी ठार झाल्याची घटना तालुक्‍यातील धानोरा जवळील बाळेवाडी फाटा येथे रविवारी (ता 11) पहाटे घडली. 
बीड येथील सागर बस या खासगी कंपनीची प्रवासी बस मुंबईहून लातूरकडे जात होती.

पहाटे चार वाजता आष्टी तालुक्‍यातील धानोरा जवळील बाळेवाडी फाटा येथे बस आल्यावर पहिल्याच वळणाला कठडा नसल्याने बस सरळ रोडच्या खाली असलेल्या खड्ड्यात कोसळली. बसने चार पलट्या खाल्या, त्यात नऊ जण जागीच ठार झाले. तर, 15 जण जखमी झाले. गंभीर जखमींना अहमदनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. जखमींपैकी तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कडा व आष्टी येथील रुग्णालयात आणण्यात आले. बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT