Anil Deshmukh
Anil Deshmukh 
राज्य

"गोयलजी...! विसरु नका, आपणही महाराष्ट्राचे सुपुत्र आहात !' 

सरकारनामा ब्युरो

नागपूर : पश्‍चिम बंगालसाठी सोडण्यात आलेल्या विशेष श्रमिक रेल्वेगाड्यांबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी जे विधान केले, ते दिशाभूल करणारे आहे. वस्तुस्थितीला अजिबात धरून नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. 

पश्‍चिम बंगालचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांनी केंद्रीय रेल्वे प्रशासनाला 22 मे रोजीच पत्र लिहून असे कळविले होते की, 26 मे पर्यंत पश्‍चिम बंगालमध्ये कोणतीही रेल्वेगाडी पाठविण्यात येऊ नये. असे असताना देखील रेल्वे प्रशासनाने त्या पत्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून केवळ महाराष्ट्राची फजिती व्हावी, तारांबळ उडावी, यासाठी 34 गाड्या काल 26 मे रोजी महाराष्ट्रात पाठवल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

अशाप्रकारे महाराष्ट्राची फसवणूक करून केंद्रीय मंत्री पियुष गोयल बाहेर सांगत फिरत आहेत की, आम्ही महाराष्ट्रात गाड्या पाठवल्या, परंतु महाराष्ट्र सरकारने श्रमिकांना बसवून त्या पश्‍चिम बंगालला पाठवल्या नाहीत. हे विधान पूर्णतः चुकीचे व दिशाभूल करणारे आहे. माझी श्री. गोयल यांना विनंती आहे की, कृपया कोरोनाशी जिवन-मरणाची लढाई सुरु असताना आपण अशा प्रकारचे राजकारण करू नये. आपणही महाराष्ट्राचे सुपुत्र आहात. याचा विसर पडू देऊ नये, असेही अनिल देशमुख म्हणाले. 

रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी काही ना काही कारस्थाने केली जात आहेत. नेमके केंद्राच्या मनात आहे तरी काय, हे कळायला मार्ग नाही. रेल्वेच्या कामकाजात प्रचंड गोंधळ सुरु आहे. गाडी पाठवली जाते एका ठिकाणी, मात्र पोचते भलत्याच स्टेशनवर. त्यामुळे आपल्या चुका सुधारण्याकडे रेल्वे मंत्रालयाने लक्ष दिले पाहीजे आणि हेतुपुरस्सर महाराष्ट्राला बदनाम करणे थांबविले पाहीजे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT