Nitin Raut
Nitin Raut 
राज्य

पालकमंत्री म्हणाले, काही बिनधास्त, तर काही एकदमच घाबरलेले ! 

अतुल मेहेरे

नागपूर : कोरोनाच्या विषाणुमुळे स्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. बाधितांसोबतच मरणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. अशाही परिस्थितीत काही लोकं बिनधास्त, तर काही एकदमच घाबरलेले आहेत, असे राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपुरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आज म्हणाले. 

या दोन्ही प्रवृत्ती सद्यस्थितीत योग्य नाहीत. जास्त बिनधास्त राहणे अंगलट येऊ शकते, तर अति घाबरल्यामुळे धास्तीनेच जीव जाण्याचा धोका संभवतो. त्यामुळे नागरिकांमध्ये जागरुकता आणण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कोरोनामुळे शहरात आणि जिल्ह्यातील मृत्युदर वाढतो आहे. त्यासाठी सर्व पक्षांचे आमदार आणि लोकप्रतिनिधींसोबत वेबिनार आयोजित करण्यात आला होता. या बैठकीनंतर डॉ. राऊत पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, आज लोकप्रतिनिधींनी सूचना मांडल्या. सर्व विभागांनी समन्वय ठेऊन लोकांमध्ये जागरुकता करावी, असे निर्देश आजच्या बैठकीत प्रशासनाला दिलेले आहेत. प्रशासनही त्याप्रमाणे काम करतेय. चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. पण काही लोक त्यांना असलेल्या आजारांची माहितीच देत नाहीत. प्रकृती जास्त झाल्यावर दवाखान्याची वाट धरतात. यामध्ये बरेच वेळा उशिर होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

लोकानी हा प्रकार करु नये, रुग्णालयाची भिती मनातून काढून टाकावी आणि तब्येतीबाबत थोडीही शंका असेल, तर तपासणी करुन घ्यावी. जेणेकरुन त्यांच्या जीवाला धोका राहणार नाही आणि प्रशासनालाही काम करणे सोपे होईल, असेही डाॅ. राऊत म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT