vaibhav-pichad-28final.jpg
vaibhav-pichad-28final.jpg 
राज्य

आमच्यावर खुशाल गुन्हे दाखल करा, शेतकरी प्रश्नांसाठी आम्ही रस्त्यावर येणारच

शांताराम काळे

अकोले : सोने गहाण ठेवून उसने पैसे घेवून बियाणे, खते आणले. तेही वायाला  गेले. सरकार काहीच करीत नाही. तुम्हाला गुन्हे दाखल करायचे, तर बिनधास्त करा. शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असे माजी आमदार वैभव पिचड यांनी अधिकाऱ्यांना फटकारले.

पिचड यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी कार्यालयात सरपंचाचे व शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत तुम्ही कुठपर्यंत कागदी घोडे नाचवून शेतकऱ्यांना उपाशी ठेवणार आहेत, असा सवाल केला. सात दिवसाचा अल्टिमेट देत मी पुन्हा येईल, असे सांगत आक्रमक झाले.

अकोले तालुक्यातील शेतकरी पावसाअभावी अडचणीत आला असेल, तर अधिकारी पंचनामे का करत नाहीत? अधिकारी कुठे गेले? लोकप्रतिनिधी कुठे आहेत? असे विचारत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पुढील सात- आठ दिवसांत जर भातशेतीचे पंचनामे झाले नाही, तर अकोले तालुक्यातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. वैभव पिचड यांनी ठणकावून सांगितले. समवेत सर्व सरपंच तसेच सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे उपस्थित होते.

तालुक्यात ५ महिने पूर्ण झाले, तरी रोजगार हमीचे कामे सुरु नाहीत. खावटी नाही. त्यामुळे शेतकरी संकटात आहे. कोरोनाचे संकट त्यात वरून राजाची साथ नाही. रोपे सडून जात आहेत. काही शेतकरी पेरणीच्यासाठी आभाळाकडे डोळे लावून पाहत आहेत. सरकार व प्रशासन याबाबीकडे डोळेझाक करीत असेल, तर न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा पिचड यांनी दिला.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT