राज्य

फडणवीस सरकारने नव्हे पंढरपुरच्या विठ्ठलांने मराठा आरक्षण दिले : धनंजय मुंडे

सरकारनामा ब्युरो

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात,"" आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले हे साफ खोटे आहे ! मराठा आरक्षण दिले ते पंढरपूरच्या विठ्ठलाने असा टोला राष्ट्रवादीचा फायरबॅंड नेते धनंजय मुंडे यांनी आज लगावला. 

विधानसभेत बोलताना मुंडे यांनी जोरदार भाषण केले. फडणवीस यांच्या भाषणापेक्षा मुंडे यांचेच भाषण गाजल्याची चर्चा होती. मुंडे म्हणाले, की तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करता आली नाही. तेव्हा मराठा आरक्षण मिळाले. मराठा समाजातील मुलांनी प्राणांची आहुती दिली तेव्हा आरक्षण मिळाले तेव्हा स्वतःची पाठ थोपटून घेऊ नका. 

मागच्या पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्र गतीहीन झाला पण आता नाही हे सरकार खऱ्याचं आहे आणि महाराष्ट्राच्या पाठी हे सरकार खंबीर राहील हेच राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात सांगितले असेही मुंडे म्हणाले. नवं सरकार कधी पडतंय यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले आहे असा आरोपही त्यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT