rohit--pawar.jpg
rohit--pawar.jpg 
राज्य

उत्तरप्रदेश घटनेबाबत आमदार रोहित पवार यांचे भाजपला असेही प्रश्न

मुरलीधर कराळे

नगर : उत्तरप्रदेश सरकारने मीडियाला रोखून पिडीत कुटुंबाला डांबून ठेवले, हा प्रकार म्हणजे लोकशाहीचा दिवसाढवळ्या खून केला. यापूर्वी मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे काहीच का बोलत नाही, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपचे नाव न घेता या पक्षावर टीका केली.

ट्विटरवर मत व्यक्त करताना रोहित पवार यांनी मत मांडले आहे. ``उत्तरप्रदेशात मिडियाला रोखून आणि पिडीत कुटुंबाला डांबून उत्तर प्रदेश सरकार दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करीत आहे. यापूर्वी मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे या घटनेवर काही बोलणार की नाही? आणखी किती दिवस गप्प बसणार ? की त्यांच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलीय? ``

उत्तरप्रदेशमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत आमदार पवार यांनी ट्विटरवरून मत व्यक्त करीत विरोधकांवर टीका केली आहे. उत्तरप्रदेश सरकारने मीडियाला रोखून धरले. तसेच संबंधित पिडित मुलीच्या कुटुंबियांना डांबून ठेवणे हा अन्याय आहे. यावर विरोधक मात्र काहीच बोलत नाहीत. महाराष्ट्राचा, मुंबईचा यापूर्वी ज्यांनी अवमान केला, ते आता काहीच का बोलत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT