collector.png
collector.png 
राज्य

जिल्हाधिकारी डाॅ. भोसले यांनी पदभार घेताच शेतकऱ्यांना दिला असा दिलासा

मुरलीधर कराळे

नगर : नूतन जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी आज पदभार घेतला. पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या स्थानिक स्तरावरील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न होतील. नुकसानग्रस्तांचे पंचनामे अचूक होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, असा दिलासा पहिल्याच दिवशी त्यांनी दिला. 

आज मावळते जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांच्याकडून डाॅ. भोसले यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतला. या  वेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्नांना हात घातला. ते म्हणाले, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः कापूस, सोयाबीन, तूर, मका, भुईमूग आदी पिकांचे नुकसान मोठे आहे. त्याचे पंचनामे नियमित होत नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे संबंधित टिमला सूचना देऊन पंचनामे वेळेत होणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे नगरअंदाजे, पिकपाणी पेरा अहवालानुसार पंचनामे केले जातील. उद्याच्या पालकमंत्र्यांच्या दाैऱ्यात आपण त्यांच्यासोबत असू, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी जिल्हयात काम केले असल्याने त्याचा अनुभव पाठिशी आहे. त्याचा फायदा नक्कीतच जनतेला करून देऊ. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT