राज्य

फडणवीसांच्या हुशारीमुळे राणेंना फारशी संधी नाही : अशोक चव्हाण

सरकारनामा ब्यूरो

पुणे : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कॉंग्रेस सोडून भारतीय जनता पक्षाशी संगत करून त्यांना काय फायदा झाला, हे त्यांनाच माहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुशार राजकारणी असल्याने राणे यांना राज्यात संधी मिळाली नाही, असे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी `सरकारनामा फेसबुक लाईव्ह'मध्ये बोलताना सांगितले. 

राणे यांनी कॉंग्रेस सोडल्यानंतर त्यांचा नेमका काय फायदा झाला, या प्रश्‍नावर बोलताना चव्हाण यांनी वरील मत व्यक्त केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत हुशार राजकारणी आहेत. त्यामुळे राणे यांनी मंत्रीमंडळाच्या माध्यमातून राज्यात काम करण्याची इच्छा व्यक्त केली तरी फडणवीस यांनी त्यांना केंद्रात खासदार म्हणून पाठविले. कॉंग्रेस व कॉंग्रेस नेतृत्वावर टीका करून भाजपाशी संग केलेल्या राणे यांना काय मिळाले हे त्यांनाच माहीत. आणखी एक खडसे आपल्या मंत्रिमंडळात नको, असा विचार फडणवीस यांनी केला असावा, असाही टोला त्यांनी लगावला.

कॉंग्रेस विचारसरणी असलेला एक पक्ष आहे. त्यामुळे त्या विचारांशी बांधील असलेल्या लोकांना पक्षात न्याय मिळतोच, असे चव्हाण यांनी या संदर्भात बोलताना स्पष्ट केले. भाजपमधील काही नाराज आमदार, खासदार हे काॅंग्रेसमध्ये येण्याची चर्चा आहे का, याबाबत चव्हाण यांनी सांगितले की तशी काही चर्चा माझ्या कानावर नाही. सत्ताधारी पक्ष सोडून कोणी लगेच येईल, असे वाटत नाही.

``फडणवीस हे व्यक्ती म्हणून चांगले आहेत. पण त्यांचे सरकार अंमलबजावणीत कमी पडते आहे. अनेक आश्वासने दिली. पण त्यातील काही पूर्ण झाले नाही. परिणामी जनतेत नाराजी आहे,``असा आरोप त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT