राज्य

खासदारकी वाचवण्यासाठी काहीजण, ज्यांचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखले आहेत त्यांच्याशी गळाभेट घेत आहेत - खोत

संपत मोरे

पुणे : " कोणीतरी पोरं टोर येतात आणि कोणाच्यातरी सांगण्यावरून आंदोलन करतात, माझं आयुष्य आंदोलनात गेलं आहे, मी भूमिका घेऊन आंदोलन केली पण आजकाल आंदोलनाचा दर्जा खालावत चालला आहे. आंदोलनाच्या नावाखाली होणाऱ्या या भ्याड कृतींना व्यक्तीद्वेषाचा वास येतोय. अशा कृती करणारी लोक आंदोलक नसून चिलटं आहेत, त्यांनी समोर येऊन आंदोलन करावीत असे आव्हान कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. 

"स्वतःला शेतकरी नेते म्हणणारे काही लोक ज्यांचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखले आहेत त्यांच्याशी गळाभेट घेत आहेत "अशी जोरदार टीका खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली. काल परभणी येथे कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर टोमॅटो फेकण्यात आले, त्यावर खोत यांनी सरकारनामाला प्रतिक्रिया दिली. 

"असली आंदोलन करणारी लोक चिलटं आहेत, अशा आंदोलनाला मी भीक घालत नाही. त्यांनी समोर येऊन आंदोलन करावीत मी एकटा यायला तयार आहे. मी चळवळीत घडलो आहे, चळवळीसाठी खस्ता खाल्या आहेत. माझ्या आयुष्यात मी आंदोलन केली पण ती कोणा व्यक्तीच्या विरोधात नव्हती तर व्यवस्थेच्या विरोधात होती. लोकांचा आवाज व्यक्त करणारी आंदोलन मी केली आहेत पण आजकाल कोणाच्यातरी सांगण्यावरून आंदोलन केली जातात. व्यक्तीद्वेष डोळ्यासमोर ठेवून आंदोलन केली जातात. चांगलं काय आणि वाईट काय हे जनतेला कळत. ' 

" काही लोकांना शेतकऱ्याच्या हितापेक्षा स्वतःची खासदारकी वाचवायची आहे त्यासाठी ते कोणाशीही युती करायला लागले आहेत. ते ज्यांच्यासोबत गळाभेट घेत आहेत ते शेतकऱ्याचे कैवारी आहेत का ? असा सवाल त्यांनी शेट्टी यांना उद्देशून विचारला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT