Charulata Tokas
Charulata Tokas 
राज्य

प्रदेशाध्यक्षपदाची कालमर्यादा ऑक्टोबरमध्येच संपली होती, नव्या जबाबदारीसाठी सज्ज...

रूपेश खैरी

वर्धा : महिला प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी यवतमाळच्या संध्या सव्वालाखे यांनी नियुक्ती नुकतीच करण्यात आली. माजी प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस नेहमी दिल्लीतच राहत असल्यामुळे त्यांची गच्छंती करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर ‘प्रदेशाध्यक्षपदाची कालमर्यादा ऑक्टोबरमध्येच संपली होती. त्यामुळे गच्छंती वगैरे झाली असे म्हणणे चुकीचे होईल, असे चारुलता टोकस म्हणाल्या. 

टोकस नेहमी दिल्ली निवासी असल्याने राज्यात महिला काँग्रेसचा विशेष प्रसार नसल्याची अनेकांनी टीका केली. यामुळेच त्यांचे पद गेल्याची चर्चा आहे. त्यावर राज्यात कॉंग्रेसची सत्ता नसताना आपण पक्षाची धुरा सांभाळली. दिल्लीत राहिली असती तर हे शक्‍य झाले नसते, असे उत्तर त्यांनी टीकाकारांना दिले. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत प्रभाताई राव यांची कन्या चारुलता टोकस यांनी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भूषविले. आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना त्या म्हणाल्या की, या पदाचा त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे नव्याला संधी देण्यात आली. जर मी पद सांभाळण्यास सक्षम नसती तर पाच वर्षे पक्षाने मला या पदावर ठेवले नसते. लोकसभा निवडणुकीच्या काळातही अनेकांनी अशाच वावड्या उठविल्या होत्या. विरोधकांना बोलण्यासाठी काही ना काही लागते. पण, माझ्या बाबतीत त्यांच्याकडे हे एकच कारण असल्याने आपण समाधानी आहो. 

नव्या जबाबदारीस तयार 
पक्षाने एका जबाबदारीतून मुक्‍त केले. यामुळे येत्या काळात काही ना काही नवी जबाबदारी येणार, हे निश्‍चित. पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील, ती आपण स्वीकारू आणि पुढचा प्रवास सुरू ठेवू, असे चारुलता टोकस यांनी यावेळी सांगितले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT