Ambadas Khaire
Ambadas Khaire Sarkarnama
राज्य

राज्यपाल कोश्यारींना पदावरून हटवा; युवक राष्ट्रवादीने राबवली ही मोहिम

सरकारनामा ब्यूरो

नाशिक : ''समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) कोणी विचारलं असत" अस आक्षेपार्ह वक्तव्य करत राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी समस्त महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे राज्यपालांना तातडीने हटवावे, अशा मागणीचे ६ हजार पत्रे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष अंबादास खैरे (Ambadas Khaire) नाशिक शहरातून राष्ट्रपतींना पाठविणार आहे, अशी माहिती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

औरंगाबाद मधील कार्यक्रमावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरु विषयीचे महत्व सांगताना महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. गुरुमुळे शिष्य घडत असतो असे सांगताना महाराजांचा एकेरी उल्लेख करत "समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारलं असत" अस वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असून त्यांनी या वक्तव्यास मागे घेत माफी मागावी, अशी मागणी होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांवर राजमाता जिजाऊनी संस्कार केले त्या आधारावर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. महाराजांचे गुरू राजमाता जिजाऊ, संत तुकाराम महाराज, दादाजी कोंडदेव हे होते. प्रसिद्ध इतिहास लेखक बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात सुद्धा समर्थ रामदास व छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट कधीच झाली नसल्याचा उल्लेख आहे. असे असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्द्ल आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न केल्याने ते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल राहायच्या लायकीचे नाही, अश्या शब्दात त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. दरम्यान, कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून सहा विभागातून प्रत्येकी हजार याप्रमाणे सहा हजार पत्र राष्ट्रपतींना पाठविणार असल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.

दरम्यान, कोश्यारी यांच्या वक्तव्यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असून कोश्यारींनी आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि माफी मागावी, अशी मागणी अनेक नेत्यांनी व शिवप्रेमींकडून होत आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी याप्रकरणी म्हटलंय की, 'राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या, तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबादमधील एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून एकप्रकारे महाराजांचा अपमानच केलाय.' त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवं होतं. 'त्यांच्या वक्तव्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत, तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं वक्तव्य त्वरित मागं घ्यावं,' असे आवाहन वजा इशारा उदयनराजेंनी राज्यपालांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT