4zp_20nagar_3.jpg
4zp_20nagar_3.jpg 
राज्य

जिल्हा परिषद ! जमविलेल्या निधीचे काय केले ?

शांताराम काळे

अकोले : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेचे निमित्त करून ग्रामविकासाला खीळ घालून जमा केलेल्या 27 कोटींचे काय झाले, असा सवाल जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी उपस्थित केला आहे. 

कोरोनामुळे ग्रामविकास ठप्प झाला. त्यात जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना फतवा काढून 14व्या वित्त आयोगाच्या व्याजाची रक्कम साधारण 27 कोटी रुपये जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचे फर्मान दिले. वास्तविक, हा निधी ग्रामविकासाचा असून, त्यातून गावाशिवारात पायाभूत सुविधांची कामे झाली असती. कोरोना उपाययोजनांच्या नावाखाली जमा झालेल्या रकमेतून 2 कोटी 50 लाखांच्या अर्सेनिक अल्बम-30 औषधखरेदी करून त्याचे नागरिकांना वाटप करण्याची घोषणा झाली. मात्र, अजून त्याचे वाटप झालेले नाही. शिवाय उर्वरित 24 कोटी 50 लाख रुपयांचा निधी कशासाठी वापरणार, हे गुलदस्त्यात आहे. 

ग्रामपंचायतींच्या मालकीचा हा निधी शिल्लक राहिला असता, तर गावातील कामे मार्गी लागली असती; परंतु कोरोनाच्या नावाखाली जनतेची एकप्रकारे फसवणूकच केली. जमा झालेल्या 27 कोटींच्या निधीचे नक्की काय झाले, याच्या चौकशीची मागणी वाकचौरे यांनी केली आहे. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT