मुंबई : विक्रोळीचे शिवसेना नगरसेवक फेरीवाल्यांकडून रोज दहा रुपये गोळा करत असल्याबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केलेला हल्ला राज्याचे पर्यावरण मंत्री व युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी परतवून लावला आहे. मनसे ही टाईमपास टोळी असल्याचा उल्लेख करत त्यांनी मनसेचे विधान उडवून लावले आहे.
विक्रोळीचे शिवसेना नगरसेवक स्थानिक फेरीवाल्यांकडून रोज पैसे गोळा करत असल्याचा प्रकार मनसेने उघडकीस आणला असून यावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली आहे. वीरप्पनने देशाला जेवढे लुटले नसेल, तेवढे मुंबई मनपाच्या सत्ताधाऱ्यांनी लुटलंय असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि विक्रोळी येथील मनसे विभाग प्रमुख शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत विक्रोळी कन्नमवार नगर येथे शिवसेना पक्षाचे नगरसेवक हे स्थानिक फेरीवाल्याकडुन दररोज दहा रुपये गोळा करतात, असे पत्रकारांना सांगितले. या पावतीवर (स्व.) बाळासाहेब ठाकरे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो असून पैसे गोळा करताना स्थानिक नगरसेवक व कार्यकर्ते हे पैसे महानगरपालिका व पोलिसांसाठी आहेत, असे सांगत असल्याचा आरोप या दोन्ही नेत्यांनी केला. याबाबत आदित्य यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी मनसे ही टाईमपास टोळी असल्याचे सांगत हे विधान उडवून लावले.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.