मुख्य बातम्या मोबाईल

शेतकऱ्यांचे दुःख मला समजते! 

सरकारनामा ब्युरो

पांगरी (सोलापूर) : "मला शेतातील समजत नसले तरी शेतकऱ्यांचे दुःख समजते,'' असे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पांगरी येथे शेतकऱ्यांशी बोलताना व्यक्त केले. 

जन आशीर्वाद यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागांत दौरा करत असताना त्यांनी पांगरीला भेट दिली. ठाकरे म्हणाले, की शहराइतकाच ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे असून, लहान-मोठा शेतकरी यामध्ये फरक न करता सरसकट कर्जमाफी केली जावी. या वेळी शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना पीकविमा, कांदा अनुदान, दुष्काळ निधी, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना या प्रश्‍नांचा ऊहापोह करणारे निवेदन दिले. या वेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शालेय साहित्य व गणवेशाचे वाटप करण्यात आले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT