मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थकवा वाट असल्याने ते क्वारंटाईन झाले आहेत. त्यांची कोरोना चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. कालपासून अजित पवारांनी आपल्या सर्व बैठका रद्द केल्या आहेत. अजित पवार यांनी आपला जनता दरबारही रद्द केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तीन दिवसांपूर्वी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांना थकवा वाटू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र ती निगेटिव्ह आली. मात्र, थकवा असल्याने त्यांनी क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. आज राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात होणारा त्यांचा जनता दरबारही रद्द करण्यात आला आहे. मात्र दुपारी २ वाजता राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत अजित पवार व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सर्व मंत्र्यांत अजित पवार यांचा जनता दरबार सर्वाधिक लोकप्रिय आहे. येथे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून आपल्या समस्या मांडतात. अजित पवारही त्यांच्या स्टाईलने तातडीने अधिकाऱ्यांना फोन करून त्या सोडविण्यासाठीचा आदेश देतात. त्यामुळे हा जनता दरबार चार तास चालतो. इतर मंत्र्यांचे दरबार दोन तासांत उरकले जातात. गुरूवारी सकाळी आठ ते बारा या वेळेत हा जनता दरबार होणार होता. या गुरूवारी मात्र तो अपरिहार्य कारणाने होणार नसल्याचे पक्षाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.