पुणे : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी मतप्रवाह असणार्या पक्षांसोबत युती करुन अल्पकाळ टिकणारे सरकार स्थापन करण्यापेक्षा दीर्घकाळ मित्र असणार्या भाजपसोबत शिवसेनेने सरकार स्थापन करावे. त्यासाठी उशिरा का होईना मुख्यमंत्रीपदाची दिलेली ऑफर शिवसेनेने स्वीकारावी, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. त्यासाठी शिवसेना नेत्यांशी दूरध्वनीद्वारे बोलणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावावर त्या आघाडीत निश्चिती झाली आहे. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नावे निश्चित होत असेल तर माझ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मन:पूर्वक शुभेच्छा आहेत. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या टोकाचा विरोधी विचार असणार्या तीन पक्षांचा किमान समान कार्यक्रम किती काळ टिकेल, हा महाराष्ट्रासमोर प्रश्न आहे. अशी चिंता ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेसला मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर काँग्रेसने शिवसेना राष्ट्रवादीच्या नव्या आघाडीला पाठिंबा देवू नये, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे हे अपेक्षित नव्हते .त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होण्यापेक्षा भाजपची ऑफर स्वीकारुन भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री व्हावे, आवाहन रामदास आठवले यांनी केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.