Thorat-Khadse.
Thorat-Khadse. 
मुख्य बातम्या मोबाईल

भाजपने एकनाथ खडसे यांच्यावर अन्याय केला  आहे:   थोरात

सिद्धेश्‍वर डुकरे

मुंबई : भाजपने कतृत्वान नेत्यांना दूर लोटले आहे .  एकनाथ खडसे यांच्यावर साहजिकच अन्याय झाला आहे. भाजपमध्ये ज्या नेत्यांमध्ये सक्षम असे नेतृत्व क्षमता होती त्यांना दुर्दैवाने दूर लोटले गेले. त्यामुळे ते सध्या नाराज आहेत. याशिवाय विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित यांची कारण नसताना तिकीटे कापली, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री  बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले . 

भाजपचे आमदार फुटणार अशी चर्चा सुरू आहे. याबाबत थोरात यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजपमधील 10 ते12 आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षातील मोठमोठ्या आणि दिग्गज नेत्यांनी आपापल्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. भाजपकडून त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली. मात्र, त्यापैकी अनेकांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे त्या सर्व बंडखोर नेत्यांमध्ये सध्या अस्वस्थता निर्माण झाली असल्याचा दावाही श्री. थोरात यांनी  यावेळी केला. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून निर्माण केलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. सरकार स्थापन होऊन एक आठवडा होत आला मात्र अध्यापही खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेण्यात आला नाही.

याबाबत थोरात यांना प्रश्न विचारला असता दोन दिवसांत खातेवाटप होईल, असे त्यांनी सांगितले आहे. खातेवाटपाचे काम आम्ही खेळीमेळीने आणि चर्चा करुन करतोय. दोन दिवसात याबाबतचे निर्णय पूर्ण होतील आणि खातेवाटप केले जाईल, असे थोरात म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT